भिजलेली पायवाट अन हात तुझ्या हातात
मग जगाचं कसलं भान मी ही नसते माझ्यात
पावलंही हळू हळू चालतात संपूच नये वाट म्हणून मुद्दामुन थांबतात
मला न तेंव्हा खुप बोलायचं असतं
पण नेमकं तेंव्हाच भावनांना आतल्या आत भांडायला सुचतं
कसं सावरू स्वतःला तेंव्हा माझंच मला नाही उमगत
कावरे बावरे डोळे अन वादळ उठतं ऊरात
मग जगाचं कसलं भान मी ही नसते माझ्यात

Kharach chhan...!
ReplyDelete